विडंबने-६ 'स्वयंवर झाले सीतेचे' आणि 'विडंबन झाले कवितेचे'
विख्यात कविता आणि त्यांची तेवढीच विख्यात विडंबने यांच्या या मालिकेत,
आता विडंबन कशाला म्हणू नये याचे एक उत्तम उदाहरण पेश करतो आहे.
मूळ कविता गदिमांच्या गीतरामायणामधली आहे.
स्वयंवर झालें सीतेचे
आकाशाशीं जडलें नातें धरणीमातेचें
स्वयंवर झालें सीतेचे ॥ धृ ॥
श्रीरामांनी सहज उचलिले धनू शंकराचें
पूर्ण जाहले जनकनृपाच्या हेतू अंतरींचे
उभे ठाकले भाग्य सांवळे समोर दुहितेचें ॥ १ ॥
मुग्ध जानकी दुरून न्याहळी राम धनुर्धारी
नयनांमाजीं एकवटुनिया निजशक्ती सारी
फुलूं लागलें फूल हळू हळू गालीं लज्जेचें ॥ २ ॥
उंचावुनिया जरा पापण्या पाहत ती राही
तडिताघातापरी भयंकर नाद तोंच होई
श्रीरामांनीं केले तुकडे दोन धनुष्याचे ॥ ३ ॥
अंधारुनिया आले डोळे, बावरले राजे
मुक्त हासतां भूमीकन्या मनोमनीं लाजे
तृप्त जाहले सचिंत लोचन क्षणांत जनकाचे ॥ ४ ॥
हात जोडुनी म्हणे नृपती तो विश्वामित्रासी
"आज जानकी अर्पियली मी दशरथापुत्रासी"
आनंदाने मिटले डोळे तृप्त मैथिलीचे ॥ ५ ॥
पित्राज्ञेने हळू उठे ती, मंत्रमुग्ध बाला
अधिर चाल ती, अधीर तीहुनी हातींची माला
गौरवर्ण ते चरण गांठती मंदिर सौख्याचे ॥ ६ ॥
नीलाकाशी जशी भरावी उषःप्रभा लाल
तसेच भरले रामांगी मधू नूपुरस्वरताल
सभामंडपी मीलन झाले माया-ब्रह्माचे ॥ ७ ॥
झुकले थोडे राम, जानकी घाली वरमाला
गगनामाजी देव करांनी करिती करताला
त्यांच्या कानी गजर पोचले मंगल वाद्यांचे ॥ ८ ॥
अंश विष्णुचा राम, धरेची दुहिता ती सीता
गंधर्वाचे सूर लागले जयगीता गातां
आकाशाशी जडले नाते ऐसे धरणीचे ॥ ९ ॥
गजानन दिगंबर माडगूळकर (गदिमा) अद्वितीय प्रतिभा व शब्दप्रभुत्वाच्या साहाय्याने ‘गीतरामायणा’सारखा दर्जेदार नजराणा महाराष्ट्राला पेश करणारे व आजही मराठी रसिकांच्या मनांत अढळ स्थान असलेले श्रेष्ठ कवी! त्यांच्या गीतरामायणातले हे एक सुप्रसिद्ध गीत आहे.
कवी, गीतकार, पटकथालेखक, कादंबरीकार, गीतरामायणकार अशा विविध स्वरूपात ग. दि. माडगूळकर यांची ओळख मराठी साहित्य क्षेत्रात आहे. घरातील परिस्थिती चांगली नसल्यामुळे त्यांनी सुरुवातीच्या काळात चरितार्थासाठी चित्रपटांच्या कथा - संवाद - गीतलेखनाचे काम केले. त्यातही त्यांची प्रतिभा, सहज सोपे शब्द, भावसंपन्न आणि मराठी मनाला सदैव मोहिनी घालणारी रचना यामुळे ते श्रेष्ठ ठरले. मराठी गीतनिर्मितीच्या क्षेत्रात गदिमांचे स्थान केवळ अजोड आहे. प्राचीन मराठी काव्यातील गीतभांडाराला अर्वाचीन काळात माडगूळकरांनी अधिक समृद्ध केले.
संताच्या काव्यातील आंतरिक गेयगुण, पंडितांच्या काव्यातील नादानुप्रास, शाहिरांच्या काव्यातील स्वाभाविक ठसका, लोकगीतांतील प्राथमिक पण सरळ भिडणारा लयताल, शब्दांवरील असामान्य प्रभुत्व आणि त्याचबरोबर समृद्ध आशयघनता यांच्या विलक्षण संमिश्रणातून माडगूळकरांची गीते निर्माण झाली. अध्यात्म, देशभक्ती, बालकविता, शृंगार हे सर्व विषय त्यांनी अतिशय सहजतेने हाताळले.
आरंभी ते वि. स. खांडेकर यांचे लेखनिक म्हणून काम करत होते. त्यांचे हस्ताक्षर खूप छान होते. तिथेच असताना त्यांना वाचनाची, लेखनाची गोडी लागली. पुढे त्यांची स्वत:ची सुगंधी-वीणा (१९४९), जोगिया (१९५९), चार संगीतिका (१९५६), गीतरामायण (१९५७), काव्यकथा (१९६२), चैत्रबन (चित्रपटगीते) (१९६२), गीतगोपाल (१९६७), गीतसौभद्र (१९६ ८)-अशी काव्यनिर्मिती झाली. ‘वैशाखी’ या नावाचा त्यांनी लिहिलेल्या चित्रपटगीतांचा संग्रह प्रसिद्ध आहे. याशिवाय कथा, कादंबरी, आत्मचरित्र या वाङ्मय प्रकारांतही त्यांनी लेखन केले. त्यांनी सुमारे १५ लघुकथा लिहिल्या; आकाशाची फळे, उभे आडवे धागे या कादंबऱ्या व युद्धाच्या सावल्या हे नाटक - इत्यादी स्वरूपाचे लेखनही त्यांनी केले. गदिमांनी सुमारे १४५ मराठी चित्रपटांची गीते लिहिली, ८० पटकथा, ४४ मराठी चित्रपटांच्या कथा व ७६ चित्रपटांचे संवादलेखन त्यांनी केले. तसेच २३ हिंदी पटकथा, १० हिंदी चित्रपट कथा, ५ हिंदी चित्रपटांचे संवाद - यांचेही लेखन त्यांनी केले. त्यांनी सुमारे २५ (२४ मराठी व १ हिंदी) चित्रपटांत अभिनयही केला.
चित्रपटातील पात्रांच्या भावनांनुसार, कथाविषयाला खुलावट आणणारी चित्रपटगीते लिहिण्यात ते सिद्धहस्त होते. गेयता, नादमाधुर्य, लयकारी आणि मराठी भाषेतील गोडवा ही त्यांच्या गीतांची वैशिष्ट्ये. उद्धवा अजब तुझे सरकार, विठ्ठला तू वेडा कुंभार, एक धागा सुखाचा शंभर धागे दु:खाचे, बाई मी विकत घेतला शाम यांसारख्या अनेक गीतांमधून साध्या सोप्या भाषेत ते मोठे तत्त्वज्ञान सांगून जातात. स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांच्या लेखणीने लोकांमध्ये प्रेरणा निर्माण केली होती. १९४२ च्या आंदोलनात, सातारा-सांगली भागात प्रतिसरकारचा प्रचार करण्यासाठी त्यांनी पोवड्यांची निर्मिती केली होती.
गीतरामायण ही गदिमांनी संपूर्ण महाराष्ट्राला दिलेली एक साहित्यिक देणगीच म्हणावी लागेल. त्यांच्या गीतरामायणाने व त्याला दिलेल्या बाबूजींच्या (ज्येष्ठ गायक व संगीतकार सुधीर फडके) संगीताने उभ्या महाराष्ट्राला वेड लावले होते. गीतरामायणाचे शेकडो प्रयोग झाले. मराठी रसिकांनी गदिमांना प्रेमादरपूर्वक महाराष्ट्राचे 'आधुनिक वाल्मिकी' अशी पदवी बहाल केली. यातूनच त्यांच्या सिकप्रियतेची खात्री पटते. गीतरामायणाचे पुढील काळात हिंदी, बंगाली, तेलगू व कानडी या भाषांत भाषांतरही झाले.
गदिमांना भारत सरकारने पद्मश्री (१९६९) हा किताब बहाल केला. ते संगीत नाटक अकादमी व विष्णुदास भावे गौरवपदक या पुरस्कारांचे मानकरी ठरले.
१९६२ ते १९७४ अशी सुमारे १२ वर्षे ते महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्यही होते. १९७३ साली यवतमाळ येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. हे आणि असे अनेक पुरस्कार त्यांना लाभले तरी जनमानसहृदयात ते गीतकार व गीतरामायणकार म्हणूनच जास्त प्रसिद्ध झाले.
श्रेयअव्हेर: वरील गदिमांची ओळख मनसेच्या संकेतस्थळावरून साभार घेतलेली आहे.
विडंबन झाले कवितेचे हे त्याचे विडंबन खोडसाळ यांनी खालीलप्रमाणे सादर केले. मनोगतावर स्वतंत्र कविता म्हणून, तर त्यांच्या 'तेंडूची पाने' या अनुदिनीवर कविता आणि विडंबन या दोन्हीही सदरांत.
ते काव्य असे आहे.
विडंबन झाले कवितेचे
प्रेषक खोडसाळ (मंगळ., १२/०८/२००८ - १६:५१)
साहित्याशी जडले नाते बोरूघाशाचे
विडंबन झाले कवितेचे ॥धृ॥
कविराजांनी धनू उचलिले गझल-रुबायांचे
पूर्ण जाहले विडंबकाच्या हेतू अंतरीचे
उडू लागले शब्दकावळे छचोर काव्याचे ॥१॥
वक्र टाळकी कसून वाचती काव्य अर्थवाही
नयनांमाजी एकवटुनिया काकदृष्टी पाही
फुलू लागले फूल हळू हळू निजल्या मज्जेचे ॥२॥
सोकावुनिया जरी विडंबन पाडत तो राही
तडिताघातापरी भयंकर वाद तोंच होई
कविराजांच्या तक्रारीचे, बोल कोपल्याचे ॥३॥
अंगारुनिया आले डोळे, चरफडले राजे
मुक्त हासऱ्या प्रतिसादांचे बघून सडे ताजे
पडू लागले तृतीय लोचन अमुच्यावर त्यांचे ॥४॥
हात जोडुनी म्हणे विडंबक तो कविराजासी
"आज विडंबन अर्पियले मी अपुल्या चरणासी"
संतापाने मिटले डोळे क्रुद्ध का कवीचे? ॥५॥
देवाज्ञेने स्फुरे अम्हाला रोज शब्दक्रीडा
अधिर लेखणी, अधिर तीहुनी डोक्यातिल कीडा
अर्थहीन हे चरण लावती लेबल पद्याचे ॥६॥
काव्याकाशी कशी भरावी उषःप्रभा लाल
उगी राहिलो वामांगी शब्देविण कंगाल
कवन रचुनिया धनी जाहलो शरसंधानाचे ॥७॥
नाही उरला राम, चालले ते वनवासाला
कविराजांच्या हात घालसी का कासोट्याला
त्यांच्या वर्मी घाव बैसले खो खो हास्याचे ॥८॥
खोडसाळ सांगाल अम्हाला का कविता लिहिता?
कविराजांचे सूर हरवले विडंबने बघता
साहित्याशी कसले नाते तुमचे डोंबलाचे? ॥९॥
खोडसाळांनी त्यांच्या ’तेंडूची पाने’ या अनुदिनीस लिहीलेली प्रस्तावना हाच त्यांचा सर्वद्न्यात खराखुरा परिचय आहे. "मनोगत ह्या मराठी भाषेला वाहिलेल्या (बहुधा) सर्वोत्कृष्ट संकेतस्थळावर अनेक प्रतिभावान हौशी कवी आपल्या रचना सादर करतात. त्या वाचून आपल्याला असे काही लिहिता येत नाही याचा मला खूप राग यायचा. सांगू नका कोणाला, पण माझी अवस्था ते काय असूयाग्रस्त की मत्सरग्रस्त म्हणतात ना तशी व्हायची. मग ठरवलं - नाही ना आपल्याला असे काही छान छान, नवनवीन कल्पनांनी नटलेले, साहित्यिक मूल्यांनी ओतप्रोत, इ. इ. लिहायला जमत, मग ठीक आहे. जे लिहितात त्यांची विडंबनात्मक टर उडवायची. कोल्ह्याला द्राक्षं आंबट, दुसरं काय. परत विडंबन करणे तुलनेने बरेच सोपे, खासकरून छंदबद्ध कविता वा गजलांचे. तयार जमीन, तयार यमकें, रेडीमेड कवाफी. आपण फक्त ओळी जराशा उलटसुलट केल्या की झाले विडंबन तयार. वाचणाऱ्यांनाही गंभीर रचनांचे अर्थ लावत बसण्यापेक्षा 'हसा आणि विसरून जा' छाप विडंबने वाचणे सोयीस्कर वाटते. त्यामुळे आमच्यासारख्यांची चलती असते. कोणी नाक मुरडलेच तर कानाच्या पाळ्या धरून आचार्य अत्र्यांच्या ' झेंडुची फुले' चा वारसा सांगावा. वर अत्यंत आदराने (नाटकं करायला आपलं काय जातय) ' क्व सूर्यप्रभवो वंश: क्व चाल्प विषयामती: ' वगैरे वाक्यं टाकावी. एकाच वेळी आपला विनम्रपणा आणि सु'संस्कृत'पणा दाखवण्याची संधी का सोडा? (संस्कृतातील ओ की ठो काही येत नसले तरी गाठीशी अशी दोन-चार वाक्य पाठ करून ठेवली आहेत मी. भाव मारण्याच्या कामी येतात. ) अशी काही विडंबने इथे देण्याचा मानस आहे. खरे तर 'टाकणार आहे' लिहिणार होतो पण 'देण्याचा मानस आहे' कसे भारदस्त वाटते, नाही? मूळ रचनांचा दुवाही देईन. विडंबन आवडो न आवडो, वाचकहो, त्या मूळ रचना जरूर वाचा ही मात्र खोडसाळाची कळकळीची विनंती आहे. त्या प्रतिभावंतांची थट्टा करण्याच्या माझ्या पापाचे यामुळे थोडे तरी परिमार्जन होईल."
खोडसाळ हे मनोगतावरील एक अत्यंत प्रथितयश प्रतिभावान आहेत. त्यांच्या विडंबनांची मोहिनी पडलेले असंख्य लोकच त्यांच्या प्रतिभेची खरीखुरी कल्पना देऊ शकतील.
मात्र या विडंबनात त्यांनी मूळ काव्यविषयाचे विडंबन केलेलेच नाही. तर केवळ प्रसिद्ध चालीचा, आकृतीबंधाचा, नवविडंबकांच्या आवडत्या वस्तूवर हल्ला बोलण्याच्या वृत्तीचे विडंबन करण्यासाठी, उत्तम उपयोग करून घेतलेला दिसून येतो. वरील दुव्यावरही त्यांनी हे काव्य स्वतंत्र कविता म्हणूनच दिलेली होती. प्रतिसादकांनी मात्र त्याचे विडंबन म्हणूनच कौतुक केलेले दिसून येते.
दोन्हीही काव्ये सुंदर आहेत. 'विडंबन झाले कवितेचे' हे मूळ 'स्वयंवर झाले सीतेचे' या गीताचे कुठल्याच निकषाने विडंबन ठरत नाही. तथाकथित विडंबनात मूळ गीताच्या चालीव्यतिरिक्त कोणतेही साम्य वा संबंध दिसून येत नाही. मात्र हे "नवविडंबकांच्या आवडत्या वस्तूवर हल्ला बोलण्याच्या वृत्तीचे विडंबन" आहे यात कसलाही संशय नाही.
म्हणून विडंबन कशाला म्हणू नये याचे मात्र हे एक चांगले उदाहरण ठरले आहे.
विडंबने लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
विडंबने लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
२००९-०७-०९
विडंबनातील 'विरामचिन्हे'
मानावा समरा जनास समरा, ताराप ताराप गा
सोडीला जव हा विडंबन लिहायाचाच संकल्प मी
वाटे मी 'इथले', विडंबन लिहाया का न घेऊ नये?
'टीकाराम' व 'खोडसाळ' प्रभृती, 'माफी'परी ते कवी
देऊ 'स्वल्पविराम' काय, मग मी माझे लिहू नाव की
कैसे ते करती विडंबन, मलाही साध्य का ते नसे?
सारेची कवि कारकून अन् चक्रपाणिंपरी होत ना!
त्यांच्या छान विडंबनांसम न का, ते काव्य माझे असे?
ऐसी ओघळती 'प्रश्नचिन्ह'परी शल्येच माझे मनी!
छापावे 'उपनाव' ठेउन पुढे, की काव्यभारे तसे
'तो', 'मी', 'ना' म्हणुनी जगास, झटकू का मी नये हातही?
वाव्वा! छान!! प्रशंसना महिवरी घेऊन ये स्वर्गही
येतो 'अर्धविराम' खास, गमते की 'नाव' हो मोकळे
भासे काव्यसृष्टी मनास जव सैलावलेली पुरी !
वाटे काव्य घडून, घट्ट करू का, त्या सृष्टीला मी तरी !
ज्ञाते सर्व मनोगती, खरच का, स्वीकारती ते तदा !
त्यांना ही रुचतील का कधितरी 'उद्गारचिन्हांकिते' ?
भाषेचे सगळेच ग्रंथ बरवे, पोथ्या तशा वाचुनी
ना ती साधतसे सुरेख रचना, ट ला ट ही ना जुळे
काव्याचा तळ गाठला गहन मी रांधून सारे असे
देवा 'पूर्णविराम' त्या विडंबनास, देशी न का सत्वरे
मनोगतावर ही विख्यात विडंबनांवर आधारित मालिका जेव्हा मी लिहीत होतो. तेव्हा एक प्रश्नावली प्रत्येक विडंबनासोबत देत असे. त्याच्या उत्तरात विश्वमोहिनी यांनी एक सुरेख कविता लिहीली होती. मात्र ती वृत्तात बसत नव्हती. मी तिला वृत्तात बसवण्याचा प्रयास केला आणि मग ती वरीलमाणे दिसू लागली.
मूळ विडंबन रचना: विश्वमोहिनी
वृत्तबंधनप्रयास: नरेंद्र गोळे
मानावा समरा जनास समरा, ताराप ताराप गा
सोडीला जव हा विडंबन लिहायाचाच संकल्प मी
वाटे मी 'इथले', विडंबन लिहाया का न घेऊ नये?
'टीकाराम' व 'खोडसाळ' प्रभृती, 'माफी'परी ते कवी
देऊ 'स्वल्पविराम' काय, मग मी माझे लिहू नाव की
कैसे ते करती विडंबन, मलाही साध्य का ते नसे?
सारेची कवि कारकून अन् चक्रपाणिंपरी होत ना!
त्यांच्या छान विडंबनांसम न का, ते काव्य माझे असे?
ऐसी ओघळती 'प्रश्नचिन्ह'परी शल्येच माझे मनी!
छापावे 'उपनाव' ठेउन पुढे, की काव्यभारे तसे
'तो', 'मी', 'ना' म्हणुनी जगास, झटकू का मी नये हातही?
वाव्वा! छान!! प्रशंसना महिवरी घेऊन ये स्वर्गही
येतो 'अर्धविराम' खास, गमते की 'नाव' हो मोकळे
भासे काव्यसृष्टी मनास जव सैलावलेली पुरी !
वाटे काव्य घडून, घट्ट करू का, त्या सृष्टीला मी तरी !
ज्ञाते सर्व मनोगती, खरच का, स्वीकारती ते तदा !
त्यांना ही रुचतील का कधितरी 'उद्गारचिन्हांकिते' ?
भाषेचे सगळेच ग्रंथ बरवे, पोथ्या तशा वाचुनी
ना ती साधतसे सुरेख रचना, ट ला ट ही ना जुळे
काव्याचा तळ गाठला गहन मी रांधून सारे असे
देवा 'पूर्णविराम' त्या विडंबनास, देशी न का सत्वरे
मनोगतावर ही विख्यात विडंबनांवर आधारित मालिका जेव्हा मी लिहीत होतो. तेव्हा एक प्रश्नावली प्रत्येक विडंबनासोबत देत असे. त्याच्या उत्तरात विश्वमोहिनी यांनी एक सुरेख कविता लिहीली होती. मात्र ती वृत्तात बसत नव्हती. मी तिला वृत्तात बसवण्याचा प्रयास केला आणि मग ती वरीलमाणे दिसू लागली.
मूळ विडंबन रचना: विश्वमोहिनी
वृत्तबंधनप्रयास: नरेंद्र गोळे
लेबल:
कविता,
विडंबनातील 'विरामचिन्हे',
विडंबने
विडंबने-५ 'माझे जीवन गाणे' आणि 'माझे जीवन खाणे'
माझे जीवन गाणे
- मंगेश पाडगावकर
माझे जीवन गाणे, गाणे || धृ ||
व्यथा असो, आनंद असू दे |
प्रकाश किंवा तिमिर असू दे ||
वाट दिसो, अथवा ना दिसू दे |
गात पुढे मज जाणे || १ ||
कधी ऐकतो गीत झर्यांतुन |
वंशवनाच्या कधी मनांतुन ||
कधि वार्यांतुन, कधि तार्यांतुन |
झुळझुळताती तराणे || २ ||
तो लीलाघन स्तय चिरंतन |
फुलापरी उमले गीतांतुन ||
स्वरास्वरांतुन आनंदाचे |
नित्य नवे नजराणे || ३ ||
गा विहगांनो माझ्यासंगे |
स्वरांवरि हा जीव तरंगे ||
तुमच्यापरि माझ्याहि स्वरांतुन |
उसळे प्रेम दिवाणे || ४ ||
मंगेश पाडगावकर यांचा परिचय विडंबने-२ मध्ये दिलेलाच आहे. त्यांचे हे गीत वसंतराव देशपांडे ह्यांनी गायलेले आहे. आणि खूपच विख्यात आहे. तुम्हीही नक्कीच ऐकलेले असेल.
माझे जीवन खाणे (माझे जीवन गाणे चे विडंबन)
- प्रभाकर बोकील, मुंबई
माझे जीवन खाणे, खाणे || धृ ||
पथ्य असो, उपवास असू दे |
प्रकार इतुके, फिकिर नसू दे ||
वाट असो, वा ताठ 'उभ्याने' |
खात निरंतर रहाणे || १ ||
कधी झोडतो, पंचपक्वान्ने |
दंश जिभेला, कधी ठेच्यातून ||
कधी भज्यांतून, कधी वड्यांतून |
विरघळतात 'बहाणे'! || २ ||
खा, जन खा हो, माझ्यासंगे |
जिव्हेवरी हा, जीव तरंगे ||
तुमच्या मुखी, रसस्वादसुखाचे |
उसळो खाद्य-तराणे || ३ ||
लोकसत्ता हास्यरंग पुरवणी-नोव्हेंबर २००३ च्या अंकात, विडंबन काव्य स्पर्धेच्या अंतर्गत हे विडंबन प्रसिद्ध झाले होते. लेखकांविषयी चार शब्द लिहावेत एवढी मला त्यांचेविषयी माहिती नाही. मात्र त्यांच्या विडंबनाचा आनंद मी मनसोक्त आस्वादिला आहे. धन्यवाद प्रभाकरजी!
माझे जीवन गाणे
- मंगेश पाडगावकर
माझे जीवन गाणे, गाणे || धृ ||
व्यथा असो, आनंद असू दे |
प्रकाश किंवा तिमिर असू दे ||
वाट दिसो, अथवा ना दिसू दे |
गात पुढे मज जाणे || १ ||
कधी ऐकतो गीत झर्यांतुन |
वंशवनाच्या कधी मनांतुन ||
कधि वार्यांतुन, कधि तार्यांतुन |
झुळझुळताती तराणे || २ ||
तो लीलाघन स्तय चिरंतन |
फुलापरी उमले गीतांतुन ||
स्वरास्वरांतुन आनंदाचे |
नित्य नवे नजराणे || ३ ||
गा विहगांनो माझ्यासंगे |
स्वरांवरि हा जीव तरंगे ||
तुमच्यापरि माझ्याहि स्वरांतुन |
उसळे प्रेम दिवाणे || ४ ||
मंगेश पाडगावकर यांचा परिचय विडंबने-२ मध्ये दिलेलाच आहे. त्यांचे हे गीत वसंतराव देशपांडे ह्यांनी गायलेले आहे. आणि खूपच विख्यात आहे. तुम्हीही नक्कीच ऐकलेले असेल.
माझे जीवन खाणे (माझे जीवन गाणे चे विडंबन)
- प्रभाकर बोकील, मुंबई
माझे जीवन खाणे, खाणे || धृ ||
पथ्य असो, उपवास असू दे |
प्रकार इतुके, फिकिर नसू दे ||
वाट असो, वा ताठ 'उभ्याने' |
खात निरंतर रहाणे || १ ||
कधी झोडतो, पंचपक्वान्ने |
दंश जिभेला, कधी ठेच्यातून ||
कधी भज्यांतून, कधी वड्यांतून |
विरघळतात 'बहाणे'! || २ ||
खा, जन खा हो, माझ्यासंगे |
जिव्हेवरी हा, जीव तरंगे ||
तुमच्या मुखी, रसस्वादसुखाचे |
उसळो खाद्य-तराणे || ३ ||
लोकसत्ता हास्यरंग पुरवणी-नोव्हेंबर २००३ च्या अंकात, विडंबन काव्य स्पर्धेच्या अंतर्गत हे विडंबन प्रसिद्ध झाले होते. लेखकांविषयी चार शब्द लिहावेत एवढी मला त्यांचेविषयी माहिती नाही. मात्र त्यांच्या विडंबनाचा आनंद मी मनसोक्त आस्वादिला आहे. धन्यवाद प्रभाकरजी!
लेबल:
कविता,
विडंबने,
विडंबने-५ 'माझे जीवन गाणे'
विडंबने-४ 'रांगोळी घालतांना पाहून' आणि 'रांगोळी घातलेली पाहून'
रांगोळी घालतांना पाहून
- कृष्णाजी केशव दामले उर्फ केशवसुत
होते अंगण गोमये सकलही संमार्जिले सुंदर,
बालार्के अपुली प्रभा वितरली नेत्रोत्सवा त्यावर;
तीची जी भगिनी अशी शुभमुखी दारी अहा पातली;
रांगोळी मग त्या स्थळी निजकरे घालावया लागली.
आधी ते लिहिले तिने रविशशी, नक्षत्रमाला तदा,
मध्ये स्वस्तिक रेखिले मग तिने आरेखिले गोष्पदा;
पद्मे, बिल्वदले, फुले, तुळसही, चक्रादिके आयुधे,
देवांची लिहिली न ते वगळिले जे चिन्ह लोकी सुधे.
होती मंजुळ गीत गात वदनी अस्पष्ट काही तरी,
गेला दाटुनी शांत तो रस अहा तेणे मदभ्यंतरी;
तीर्थे, देव, सती, मुनी, नरपती, देवी तशा पावना,
अंतर्दृष्टिपुढूनिया सरकल्या, संतोष झाला मना!
चित्रे मी अवलोकिली रुचिर जी, काव्ये तशी चांगली,
त्यांही देखिल न स्मरेच इतुकी मद्वृत्ति आनंदली;
लीलेने स्वकरे परंतु चतुरे! तू काढिल्या आकृती,
त्या या पाहुनि रंगली अतिशये आहे मदीया मति.
रांगोळीत तुझ्या विशेष गुण जो आर्ये! मला वाटतो,
स्पष्टत्वे इतुक्या अशक्य मिळणे काव्यात, चित्रात तो;
स्वर्भूसंग असा तयात इतुक्या अल्पावकाशी नसे
कोणी दाखविला अजून सुभगे! जो साधिला तू असे.
आदित्यादिक आकृती सुचविती दिव्यत्व ते उज्ज्वल,
तैसे स्वस्तिक सूचवी सफलता धर्मार्थकामांतिल;
पावित्र्याप्रत गोष्पदे, तुळसही, शोभेस ही सारसे,
पुष्पे प्रीतिस, चक्र हे सुचविते द्वारी हरी या असे!
तत्त्वे मंगल सर्वही विहरती स्वर्गी तुझ्या या अये!
आर्ये! तू उपचारिकाच गमसी देवी तयांची स्वये.
नाते, स्नेह, निदान ओळख जरी येथे मला आणिती,
होतो मी तर पाद सेवुनी तुझे रम्य स्थळी या कृती!
चित्ती किल्मिष ज्याचिया वसतसे ऐशा जनालागुनी
या चिन्हांतुनि हा निषेध निघतो आहे गमे मन्मनी-
"जा मागे अपुल्या, न दृष्टि कर या द्वाराकडे वाकडी,
पापेच्छूवरि हे सुदर्शन पहा आणिल की साकडी!"
"आहे निर्मल काय अन्तर तुझे? मांगल्य की जाणसी?
लोभक्षोभजये उदात्त हृदयी व्हायास का इच्छिसी?
ये येथे तर, या शुभाकृति मनी घे साच अभ्यासुनी."
आर्ये स्वागत हे निघे सरळ या त्वल्लेखनापासुनी.
साध्याही विषयात आशय कधी मोठा किती आढळे,
नित्याच्या अवलोकने जन परी होती पहा आंधळे!
रांगोळी बघुनी इत:पर तरी होणे तयी शाहणे,
कोठे स्वर्गसमक्षता प्रकटते ते नेहमी पाहणे!
१८ डिसेंबर, १८९६
करमणूक, २६-१२-९६
का. रत्नावली, फे., १९०१
कृष्णाजी केशव दामले उर्फ केशवसुत यांचा परिचय विडंबने-१ मध्ये दिलेलाच आहे. ही कविता त्यांच्या 'हरपले श्रेय' ह्या कवितासंग्रहातून घेतलेली आहे.
रांगोळी घातलेली पाहून ('रांगोळी घालतांना पाहून'चे विडंबन)
- राम गणेश गडकरी उर्फ गोविंदाग्रज
"साध्याही विषयात आशय कधी मोठा किती आढळे;
नित्याच्या अवलोकने परि किती होती जगी आंधळे!
रांगोळी बघुनी इत:पर तरी होणे तयी शाहणे,"
रांगोळी बघुनीच केशवसुता हे आठवे बोलणे.
रांगोळीत तुझ्या विशेष गुण जो आर्या! मला वाटतो,
स्पष्टत्वे इतुक्या अशक्य कथणे वाटे तुला काय तो?
जो तूते वदवे न अर्थ मनिचा तोंडात आला तरी,
तो मी बोलुनि दाखवीन अगदी साध्याच शब्दी परी.
चैत्री आंगण गोमये सकलही संमार्जिले सुंदर,
रांगोळीहि कुणी तिथे निजकरी ती घातली त्यावर.
ज्यां आमंत्रण त्या घरी मुळि नसे ऐशा स्त्रियांलागुनी
त्या चिन्हांतुनि हा विशेष निघतो आहे गमे मन्मनी-
या या! आज असे सुरेख हळदीकुंकू पहा या स्थली
बत्तासे बहु खोबरे हरभरे खैरात ही चालली!
ठावे कोण न जात येत- दिधले कोणास आमंत्रण;
नाही दाद घरात ही मुळि कुणा; दे धीर हे लक्षण.
संधी टाकुनि छान फौज तुमची कोठे पुढे चालली?
बायांनो! अगदी खुबी विसरता तैलंगवृत्तीतली !
नाते, स्नेह, निदान ओळख तुम्हा येथे न आणी तरी,
या; आमंत्रण राहुं द्या; परि शिरा सार्याजणी या घरी!
लाभे ते फुकटातलेच हळदीकुंकू तुम्हाला जरी,
होई काय नफा अचानक तयामाजी न कित्तीतरी?
ही आगंतुकवृत्ति आपण जरी धिक्कारिली यापरी,
प्राप्ती चार घरे उगीच फिरुनी होईल का हो तरी?
चाले काय असे उगीच भिऊनी? तुम्हीच सांगा खरे!
या डोळा चुकवून नीट; डरतां आता कशाला बरे?
कोणाच्या नजरेत येइल तरी होणे असे काहि का?
केला का खटला कुणावर कुणी ऐसा अजुनी फुका!
बायांनो! तर या, नकाच दवडू संधी अशी हातची,
जा जे काही मिळेल तेच भरल्या रस्त्यातुनी खातची!
कामे ही असली हितावह कधी होतील का लाजुनी?
या-या-या तर धावुनी; त्यजु नका रीती पुराणी जुनी!
कोणाच्या घरचे असेल हळदीकुंकू कधी नेमके
ज्या बायांस नसेल हे चुकुनिया केव्हा तरी ठाउके,
रांगोळी बघुनी इत:पर तरी होणे तयी शाहणे,
कोठे चालत काय काय अगदी हे नेहमी पाहणे!
राम गणेश गडकरी उर्फ गोविंदाग्रज ह्यांचा परिचय विडंबने-३ मध्ये करून दिलेलाच आहे. हे विडंबन त्यांच्या 'संपूर्ण वाग्वैजयंती' ह्या काव्यसंग्रहातून घेतलेले आहे.
रांगोळी घालतांना पाहून
- कृष्णाजी केशव दामले उर्फ केशवसुत
होते अंगण गोमये सकलही संमार्जिले सुंदर,
बालार्के अपुली प्रभा वितरली नेत्रोत्सवा त्यावर;
तीची जी भगिनी अशी शुभमुखी दारी अहा पातली;
रांगोळी मग त्या स्थळी निजकरे घालावया लागली.
आधी ते लिहिले तिने रविशशी, नक्षत्रमाला तदा,
मध्ये स्वस्तिक रेखिले मग तिने आरेखिले गोष्पदा;
पद्मे, बिल्वदले, फुले, तुळसही, चक्रादिके आयुधे,
देवांची लिहिली न ते वगळिले जे चिन्ह लोकी सुधे.
होती मंजुळ गीत गात वदनी अस्पष्ट काही तरी,
गेला दाटुनी शांत तो रस अहा तेणे मदभ्यंतरी;
तीर्थे, देव, सती, मुनी, नरपती, देवी तशा पावना,
अंतर्दृष्टिपुढूनिया सरकल्या, संतोष झाला मना!
चित्रे मी अवलोकिली रुचिर जी, काव्ये तशी चांगली,
त्यांही देखिल न स्मरेच इतुकी मद्वृत्ति आनंदली;
लीलेने स्वकरे परंतु चतुरे! तू काढिल्या आकृती,
त्या या पाहुनि रंगली अतिशये आहे मदीया मति.
रांगोळीत तुझ्या विशेष गुण जो आर्ये! मला वाटतो,
स्पष्टत्वे इतुक्या अशक्य मिळणे काव्यात, चित्रात तो;
स्वर्भूसंग असा तयात इतुक्या अल्पावकाशी नसे
कोणी दाखविला अजून सुभगे! जो साधिला तू असे.
आदित्यादिक आकृती सुचविती दिव्यत्व ते उज्ज्वल,
तैसे स्वस्तिक सूचवी सफलता धर्मार्थकामांतिल;
पावित्र्याप्रत गोष्पदे, तुळसही, शोभेस ही सारसे,
पुष्पे प्रीतिस, चक्र हे सुचविते द्वारी हरी या असे!
तत्त्वे मंगल सर्वही विहरती स्वर्गी तुझ्या या अये!
आर्ये! तू उपचारिकाच गमसी देवी तयांची स्वये.
नाते, स्नेह, निदान ओळख जरी येथे मला आणिती,
होतो मी तर पाद सेवुनी तुझे रम्य स्थळी या कृती!
चित्ती किल्मिष ज्याचिया वसतसे ऐशा जनालागुनी
या चिन्हांतुनि हा निषेध निघतो आहे गमे मन्मनी-
"जा मागे अपुल्या, न दृष्टि कर या द्वाराकडे वाकडी,
पापेच्छूवरि हे सुदर्शन पहा आणिल की साकडी!"
"आहे निर्मल काय अन्तर तुझे? मांगल्य की जाणसी?
लोभक्षोभजये उदात्त हृदयी व्हायास का इच्छिसी?
ये येथे तर, या शुभाकृति मनी घे साच अभ्यासुनी."
आर्ये स्वागत हे निघे सरळ या त्वल्लेखनापासुनी.
साध्याही विषयात आशय कधी मोठा किती आढळे,
नित्याच्या अवलोकने जन परी होती पहा आंधळे!
रांगोळी बघुनी इत:पर तरी होणे तयी शाहणे,
कोठे स्वर्गसमक्षता प्रकटते ते नेहमी पाहणे!
१८ डिसेंबर, १८९६
करमणूक, २६-१२-९६
का. रत्नावली, फे., १९०१
कृष्णाजी केशव दामले उर्फ केशवसुत यांचा परिचय विडंबने-१ मध्ये दिलेलाच आहे. ही कविता त्यांच्या 'हरपले श्रेय' ह्या कवितासंग्रहातून घेतलेली आहे.
रांगोळी घातलेली पाहून ('रांगोळी घालतांना पाहून'चे विडंबन)
- राम गणेश गडकरी उर्फ गोविंदाग्रज
"साध्याही विषयात आशय कधी मोठा किती आढळे;
नित्याच्या अवलोकने परि किती होती जगी आंधळे!
रांगोळी बघुनी इत:पर तरी होणे तयी शाहणे,"
रांगोळी बघुनीच केशवसुता हे आठवे बोलणे.
रांगोळीत तुझ्या विशेष गुण जो आर्या! मला वाटतो,
स्पष्टत्वे इतुक्या अशक्य कथणे वाटे तुला काय तो?
जो तूते वदवे न अर्थ मनिचा तोंडात आला तरी,
तो मी बोलुनि दाखवीन अगदी साध्याच शब्दी परी.
चैत्री आंगण गोमये सकलही संमार्जिले सुंदर,
रांगोळीहि कुणी तिथे निजकरी ती घातली त्यावर.
ज्यां आमंत्रण त्या घरी मुळि नसे ऐशा स्त्रियांलागुनी
त्या चिन्हांतुनि हा विशेष निघतो आहे गमे मन्मनी-
या या! आज असे सुरेख हळदीकुंकू पहा या स्थली
बत्तासे बहु खोबरे हरभरे खैरात ही चालली!
ठावे कोण न जात येत- दिधले कोणास आमंत्रण;
नाही दाद घरात ही मुळि कुणा; दे धीर हे लक्षण.
संधी टाकुनि छान फौज तुमची कोठे पुढे चालली?
बायांनो! अगदी खुबी विसरता तैलंगवृत्तीतली !
नाते, स्नेह, निदान ओळख तुम्हा येथे न आणी तरी,
या; आमंत्रण राहुं द्या; परि शिरा सार्याजणी या घरी!
लाभे ते फुकटातलेच हळदीकुंकू तुम्हाला जरी,
होई काय नफा अचानक तयामाजी न कित्तीतरी?
ही आगंतुकवृत्ति आपण जरी धिक्कारिली यापरी,
प्राप्ती चार घरे उगीच फिरुनी होईल का हो तरी?
चाले काय असे उगीच भिऊनी? तुम्हीच सांगा खरे!
या डोळा चुकवून नीट; डरतां आता कशाला बरे?
कोणाच्या नजरेत येइल तरी होणे असे काहि का?
केला का खटला कुणावर कुणी ऐसा अजुनी फुका!
बायांनो! तर या, नकाच दवडू संधी अशी हातची,
जा जे काही मिळेल तेच भरल्या रस्त्यातुनी खातची!
कामे ही असली हितावह कधी होतील का लाजुनी?
या-या-या तर धावुनी; त्यजु नका रीती पुराणी जुनी!
कोणाच्या घरचे असेल हळदीकुंकू कधी नेमके
ज्या बायांस नसेल हे चुकुनिया केव्हा तरी ठाउके,
रांगोळी बघुनी इत:पर तरी होणे तयी शाहणे,
कोठे चालत काय काय अगदी हे नेहमी पाहणे!
राम गणेश गडकरी उर्फ गोविंदाग्रज ह्यांचा परिचय विडंबने-३ मध्ये करून दिलेलाच आहे. हे विडंबन त्यांच्या 'संपूर्ण वाग्वैजयंती' ह्या काव्यसंग्रहातून घेतलेले आहे.
विडंबने-३ 'विरामचिन्हे' आणि कवीची 'विरामचिन्हे'
'विरामचिन्हे'- राम गणेश गडकरी उर्फ गोविंदाग्रज
जेव्हा जीवनलेखनास जगती प्रारंभ मी मांडिला,
जो जो दृष्टित ये पदार्थ सहजी वाटे हवासा मला!
बाल्याची पहिली अशी बदलती दृष्टी सदा बागडे,
तेव्हा 'स्वल्पविराम' मात्र दिसती स्वच्छंद चोहीकडे!
आहे काय जगात? काय तिकडे? हे कोण? कोठे असे?
सांगा ईश्वर कोण? त्यापलिकडे ते काय? केंव्हा? कसे?
जे ते पाहुनि यापरी भकतसे, दृक् संशये टाकित,
सारा जीवनलेख मी करितसे तै 'प्रश्नचिन्हां'कित.
अर्धांगी पुढती करी वश मना श्रुंगारदेवी नटे,
अर्धे जीवन सार्थ होइल इथे साक्षी मनाची पटे;
प्रेमाने मग एकजीव बनता भूमीवरी स्वर्ग ये !
केला 'अर्धविराम' तेथ; गमले येथून हालू नये !
झाली व्यापक दृष्टि; चित्त फिरले साश्चर्य विश्वांतरी,
दिक्कालादि अनंतरूप बघता मी होत वेड्यापरी !
सूक्ष्मस्थूलहि सारखी भ्रमविती; लागे मुळी अंत न,
त्याकाळी मग जाहले सहजची 'उद्गार'वाची मन !
आशा, प्रेम, नवीन वैभव, तशी कीर्तिप्रभा, सद्यश -
ही एकेक समर्थ आज नसती चित्ता कराया वश !
सर्वांचा परमोच्च संगम चिरं जेथे असे जाहला,
देवा! 'पूर्णविराम' त्या तव पदी दे शीघ्र आता मला !
राम गणेश गडकरी उर्फ गोविंदाग्रज (२६ मे १८८५- २३ जानेवारी १९१९, सावनेर) हे मराठीतील संगीत नाटकांचे प्रख्यात नाटककार होते. मात्र ते तेवढेच सिद्धहस्त कवी आणि विनोदी लेखकही होते.
विनोदी लेखन त्यांनी 'बाळकराम' ह्या टोपणनावाने केले. त्यांच्या कवितांचा संग्रह डॉ.भीमराव कुलकर्णी यांनी 'संपूर्ण वाग्वैजयंती' ह्या नावाने प्रसिद्ध केलेला आहे. प्रस्तुत कविता ह्याच पुस्तकाच्या २६ मे १९८५ ह्या त्यांच्या जन्मशताब्दीदिनी प्रसिद्ध झालेल्या पंधराव्या आवृत्तीतून घेतलेली आहे.
कवीची 'विरामचिन्हे' ('विरामचिन्हे' चे विडंबन)
- आचार्य प्रल्हाद केशव अत्रे उर्फ केशवकुमार
मानवी जीवनलेखांतील गोविंदाग्रजांनी दर्शविलेल्या 'विराम-चिन्हां' पेक्षा कवीच्या आयुष्यातील 'विरामचिन्हे' निराळी असावीत ही गोष्ट हल्ली शुद्धलेखनासंबंधी चालू असलेल्या वादास धरूनच नाही काय!
जेव्हा काव्य लिहावयास जगती प्रारंभ मी मांडिला,
जे जे दृष्टित ये तयावर 'करू का काव्य?' वाटे मला,
तारा, चंद्र, फुले, मुले किति तरी वस्तू लिहाया पुढे,
तेव्हा 'स्वल्पविराम' मात्र दिसतो स्वच्छंद चोहीकडे !
झाले काव्य लिहून - यास कुठल्या धाडू परी मासिका?
याते छापिल कोण? लावू वशिला कोठे? कसा नेमका?
रद्दीमाजि पडेल का? परत वा साभार हे येईल?
सारे लेखन तेधवा करितसे मी 'प्रश्नचिन्हा' कुल!
अर्धांगी पुढती करून कविता नावे तिच्या धाडिली,
अर्धे काम खलास होइल अशी साक्षी मनी वाटली !
कैसा हा फसणार डाव? कविता छापून तेव्हाच ये !
केला 'अर्धविराम' तेथ; गमले तेथून हालू नये !
झाली मासिकसृष्टि सर्व मजला कालांतरे मोकळी,
केले मी मग काव्यगायन सुरू स्वच्छंद ज्या त्या स्थळी !
माझे 'गायन' ऐकताच पळती तात्काळ श्रोतेजन !
त्या काळी मग होतसे सहजची 'उद्गार' वाची मन !
पुढील श्लोक 'कोरसा' दाखल असून तो वाचकांनी कवीला ऐकू न जाईल अशा हलक्या स्वरांत गुणगुणावयाचा आहे. बाकी ऐकू गेले तरी काय व्हायचे आहे म्हणा?
डेंग्यू, प्लेग, मलेरिया, ज्वर तसे अन् इन्फ्लुएन्झा जरी
ही एकेक समर्थ आज असती न्याया स्मशानांतरी -
सर्वांचा परमोच्च संगम चिरं जेथे परी साधला,
देवा,'पूर्णविराम', त्या कविस या देशी न का आजला? १
१. आमच्या गायनप्रिय रसिक वाचकांसाठी वरील कवितेचे 'नोटेशन' आम्ही येथे देत आहोत. त्यामुळे कवितेच्या अर्थाबरोबर तिच्यातील 'संगीत' ही वाचकांना सहज समजून येईल. काव्यगायनेच्छू बालकवींचीही त्यामुळे चांगलीच सोय होणार आहे. मात्र 'स्वरलेखन' करतांना आम्ही 'प्रो.मौलाबक्षांची चिन्हे' न वापरता आमची स्वतःची 'चिन्हे' वापरली आहेत, हे एक सुचिन्हच नव्हे काय? स्थलाभावामुळे टंकालयातील (फौंड्री) टंचाईमुळे दर श्लोकातील एकाच चरणाचे नोटेशन देणे शक्य झाले आहे.
, ? ; ! . ॥ ध्रु ॥
,ऽऽ ;ऽ ,ऽऽऽ ,ऽऽऽ ,ऽऽऽऽऽ १
?ऽऽ ?ऽ ?ऽऽऽ ?ऽऽऽ ?ऽऽऽऽऽ २
;ऽऽ ;ऽ ;ऽऽऽ ;ऽऽऽ ;ऽऽऽऽऽ ३
!ऽऽ !ऽ !ऽऽऽ !ऽऽऽ !ऽऽऽऽऽ ४
.ऽऽ .ऽ .ऽऽऽ .ऽऽऽ .ऽऽऽऽऽ ५
आचार्य अत्रे ह्यांचा परिचय विडंबने-१ मध्ये दिलेलाच आहे.
'विरामचिन्हे'- राम गणेश गडकरी उर्फ गोविंदाग्रज
जेव्हा जीवनलेखनास जगती प्रारंभ मी मांडिला,
जो जो दृष्टित ये पदार्थ सहजी वाटे हवासा मला!
बाल्याची पहिली अशी बदलती दृष्टी सदा बागडे,
तेव्हा 'स्वल्पविराम' मात्र दिसती स्वच्छंद चोहीकडे!
आहे काय जगात? काय तिकडे? हे कोण? कोठे असे?
सांगा ईश्वर कोण? त्यापलिकडे ते काय? केंव्हा? कसे?
जे ते पाहुनि यापरी भकतसे, दृक् संशये टाकित,
सारा जीवनलेख मी करितसे तै 'प्रश्नचिन्हां'कित.
अर्धांगी पुढती करी वश मना श्रुंगारदेवी नटे,
अर्धे जीवन सार्थ होइल इथे साक्षी मनाची पटे;
प्रेमाने मग एकजीव बनता भूमीवरी स्वर्ग ये !
केला 'अर्धविराम' तेथ; गमले येथून हालू नये !
झाली व्यापक दृष्टि; चित्त फिरले साश्चर्य विश्वांतरी,
दिक्कालादि अनंतरूप बघता मी होत वेड्यापरी !
सूक्ष्मस्थूलहि सारखी भ्रमविती; लागे मुळी अंत न,
त्याकाळी मग जाहले सहजची 'उद्गार'वाची मन !
आशा, प्रेम, नवीन वैभव, तशी कीर्तिप्रभा, सद्यश -
ही एकेक समर्थ आज नसती चित्ता कराया वश !
सर्वांचा परमोच्च संगम चिरं जेथे असे जाहला,
देवा! 'पूर्णविराम' त्या तव पदी दे शीघ्र आता मला !
राम गणेश गडकरी उर्फ गोविंदाग्रज (२६ मे १८८५- २३ जानेवारी १९१९, सावनेर) हे मराठीतील संगीत नाटकांचे प्रख्यात नाटककार होते. मात्र ते तेवढेच सिद्धहस्त कवी आणि विनोदी लेखकही होते.
विनोदी लेखन त्यांनी 'बाळकराम' ह्या टोपणनावाने केले. त्यांच्या कवितांचा संग्रह डॉ.भीमराव कुलकर्णी यांनी 'संपूर्ण वाग्वैजयंती' ह्या नावाने प्रसिद्ध केलेला आहे. प्रस्तुत कविता ह्याच पुस्तकाच्या २६ मे १९८५ ह्या त्यांच्या जन्मशताब्दीदिनी प्रसिद्ध झालेल्या पंधराव्या आवृत्तीतून घेतलेली आहे.
कवीची 'विरामचिन्हे' ('विरामचिन्हे' चे विडंबन)
- आचार्य प्रल्हाद केशव अत्रे उर्फ केशवकुमार
मानवी जीवनलेखांतील गोविंदाग्रजांनी दर्शविलेल्या 'विराम-चिन्हां' पेक्षा कवीच्या आयुष्यातील 'विरामचिन्हे' निराळी असावीत ही गोष्ट हल्ली शुद्धलेखनासंबंधी चालू असलेल्या वादास धरूनच नाही काय!
जेव्हा काव्य लिहावयास जगती प्रारंभ मी मांडिला,
जे जे दृष्टित ये तयावर 'करू का काव्य?' वाटे मला,
तारा, चंद्र, फुले, मुले किति तरी वस्तू लिहाया पुढे,
तेव्हा 'स्वल्पविराम' मात्र दिसतो स्वच्छंद चोहीकडे !
झाले काव्य लिहून - यास कुठल्या धाडू परी मासिका?
याते छापिल कोण? लावू वशिला कोठे? कसा नेमका?
रद्दीमाजि पडेल का? परत वा साभार हे येईल?
सारे लेखन तेधवा करितसे मी 'प्रश्नचिन्हा' कुल!
अर्धांगी पुढती करून कविता नावे तिच्या धाडिली,
अर्धे काम खलास होइल अशी साक्षी मनी वाटली !
कैसा हा फसणार डाव? कविता छापून तेव्हाच ये !
केला 'अर्धविराम' तेथ; गमले तेथून हालू नये !
झाली मासिकसृष्टि सर्व मजला कालांतरे मोकळी,
केले मी मग काव्यगायन सुरू स्वच्छंद ज्या त्या स्थळी !
माझे 'गायन' ऐकताच पळती तात्काळ श्रोतेजन !
त्या काळी मग होतसे सहजची 'उद्गार' वाची मन !
पुढील श्लोक 'कोरसा' दाखल असून तो वाचकांनी कवीला ऐकू न जाईल अशा हलक्या स्वरांत गुणगुणावयाचा आहे. बाकी ऐकू गेले तरी काय व्हायचे आहे म्हणा?
डेंग्यू, प्लेग, मलेरिया, ज्वर तसे अन् इन्फ्लुएन्झा जरी
ही एकेक समर्थ आज असती न्याया स्मशानांतरी -
सर्वांचा परमोच्च संगम चिरं जेथे परी साधला,
देवा,'पूर्णविराम', त्या कविस या देशी न का आजला? १
१. आमच्या गायनप्रिय रसिक वाचकांसाठी वरील कवितेचे 'नोटेशन' आम्ही येथे देत आहोत. त्यामुळे कवितेच्या अर्थाबरोबर तिच्यातील 'संगीत' ही वाचकांना सहज समजून येईल. काव्यगायनेच्छू बालकवींचीही त्यामुळे चांगलीच सोय होणार आहे. मात्र 'स्वरलेखन' करतांना आम्ही 'प्रो.मौलाबक्षांची चिन्हे' न वापरता आमची स्वतःची 'चिन्हे' वापरली आहेत, हे एक सुचिन्हच नव्हे काय? स्थलाभावामुळे टंकालयातील (फौंड्री) टंचाईमुळे दर श्लोकातील एकाच चरणाचे नोटेशन देणे शक्य झाले आहे.
, ? ; ! . ॥ ध्रु ॥
,ऽऽ ;ऽ ,ऽऽऽ ,ऽऽऽ ,ऽऽऽऽऽ १
?ऽऽ ?ऽ ?ऽऽऽ ?ऽऽऽ ?ऽऽऽऽऽ २
;ऽऽ ;ऽ ;ऽऽऽ ;ऽऽऽ ;ऽऽऽऽऽ ३
!ऽऽ !ऽ !ऽऽऽ !ऽऽऽ !ऽऽऽऽऽ ४
.ऽऽ .ऽ .ऽऽऽ .ऽऽऽ .ऽऽऽऽऽ ५
आचार्य अत्रे ह्यांचा परिचय विडंबने-१ मध्ये दिलेलाच आहे.
लेबल:
कविता,
विडंबने,
विडंबने-३ 'विरामचिन्हे'
विडंबने-२ दासबोध आणि उदासबोध
॥ समर्थ रामदासांचा दासबोध दशक १ ॥
॥ स्तवननाम दशक प्रथम ॥
॥ श्रीराम ॥
श्रोते पुसती कोण ग्रंथ। काय बोलिलें जी येथ ।
श्रवण केलियानें प्राप्त । काय आहे ॥ १ ॥
ग्रंथा नाम दासबोध। गुरुशिष्यांचा संवाद ।
येथ बोलिला विशद । भक्तिमार्ग ॥ २ ॥
नवविधा भक्ति आणि ज्ञान । बोलिलें वैराग्याचें लक्षण ।
बहुधा अध्यात्म निरोपण। निरोपिलें ॥ ३ ॥
भक्तिचेन योगें देव। निश्चयें पावती मानव ।
ऐसा आहे अभिप्राव। ईये ग्रंथीं ॥ ४ ॥
मुख्य भक्तीचा निश्चयो। शुद्धज्ञानाचा निश्चयो ।
आत्मस्थितीचा निश्चयो। बोलिला असे ॥ ५ ॥
शुद्ध उपदेशाचा निश्चयो। सायोज्यमुक्तीचा निश्चयो ।
मोक्षप्राप्तीचा निश्चयो । बोलिला असे ॥ ६ ॥
शुद्धस्वरूपाचा निश्चयो । विदेहस्थितीचा निश्चयो ।
अलिप्तपणाचा निश्चयो। बोलिला असे ॥ ७ ॥
मुख्य देवाचा निश्चयो। मुख्य भक्ताचा निश्चयो ।
जीवशिवाचा निश्चयो। बोलिला असे ॥ ८ ॥
मुख्य ब्रह्माचा निश्चयो । नाना मतांचा निश्चयो ।
आपण कोण हा निश्चयो । बोलिला असे ॥ ९ ॥
मुख्य उपासनालक्षण । नाना कवित्वलक्षण ।
नाना चातुर्यलक्षण । बोलिलें असे ॥ १० ।
मायोद्भवाचें लक्षण । पंचभूतांचे लक्षण ।
कर्ता कोण हें लक्षण । बोलिलें असे ॥ ११ ॥
नाना किंत निवारिले । नाना संशयो छेदिले ।
नाना आशंका फेडिले । नाना प्रश्न ॥ १२ ॥
ऐसें बहुधा निरोपिलें । ग्रंथगर्भी जें बोलिलें ।
तें अवघेंचि अनुवादलें । न वचे किं कदा ॥ १३ ॥
तथापि अवघा दासबोध । दशक फोडून केला विशद ।
जे जे दशकींचा अनुवाद । ते ते दशकीं बोलिला ॥ १४ ॥
नाना ग्रंथांच्या समती । उपनिषदें वेदांत श्रुती ।
आणि मुख्य आत्मप्रचीती । शास्त्रेंसहित ॥ १५ ॥
नाना समतीअन्वये । म्हणौनी मिथ्या म्हणतां न ये ।
तथापि हें अनुभवासि ये । प्रत्यक्ष आतां ॥ १६ ॥
मत्सरें यासी मिथ्या म्हणती । तरी अवघेचि ग्रंथ उछेदती ।
नाना ग्रंथांच्या समती । भगवद्वाक्यें ॥ १७ ॥
शिवगीता रामगीता । गुरुगीता गर्भगीता ।
उत्तरगीता अवधूतगीता । वेद आणी वेदांत ॥ १८ ॥
भगवद्गीता ब्रह्मगीता । हंसगीता पाण्डवगीता ।
गणेशगीता येमगीता । उपनिषदें भागवत ॥ १९ ॥
इत्यादिक नाना ग्रंथ । समतीस बोलिले येथ ।
भगवद्वाक्ये येथार्थ । निश्चयेंसीं ॥ २० ॥
भगवद्वचनीं अविश्वासे । ऐसा कोण पतित असे
भगवद्वाक्याविरहित नसे । बोलणे येथीचें ॥ २१ ॥
पूर्णग्रंथ पाहिल्याविण । उगाच ठेवी जो दूषण ।
तो दुरात्मा दुराभिमान । मत्सरें करी ॥ २२ ॥
अभिमानें उठे मत्सर । मत्सरें ये तिरस्कार ।
पुढें क्रोधाचा विकार । प्रबळे बळें ॥ २३ ॥
ऐसा अंतरी नासला । कामक्रोधें खवळला ।
अहंभावे पालटला । प्रत्यक्ष दिसे ॥ २४ ॥
कामक्रोधें लिथाडिला । तो कैसा म्हणावा भला ।
अमृत सेवितांच पावला । मृत्य राहो ॥ २५ ॥
आतां असो हें बोलणें । अधिकारासारिखें घेणें ।
परंतु अभिमान त्यागणें । हें उत्तमोत्तम ॥ २६ ॥
मागां श्रोतीं आक्षेपिलें । जी ये ग्रंथीं काय बोलिलें ।
तें सकळहि निरोपिलें । संकळीत मार्गे ॥ २७ ॥
आतां श्रवण केलियाचें फळ । क्रिया पालटे तत्काळ ।
तुटे संशयाचें मूळ। येकसरां ॥ २८ ॥
मार्ग सांपडे सुगम। न लगे साधन दुर्गम ।
सायोज्यमुक्तीचें वर्म । ठांइं पडे ॥ २९ ॥
नासे अज्ञान दुःख भ्रांती । शीघ्रचि येथें ज्ञानप्राप्ती ।
ऐसी आहे फळश्रुती । ईये ग्रंथीं ॥ ३० ॥
योगियांचे परम भाग्य । आंगीं बाणे तें वैराग्य ।
चातुर्य कळे यथायोग्य । विवेकेंसहित ॥ ३१ ॥
भ्रांत अवगुणी अवलक्षण । तेंचि होती सुलक्षण ।
धूर्त तार्किक विचक्षण । समयो जाणती ॥ ३२ ॥
आळसी तेचि साक्षपी होती । पापी तेचि प्रस्तावती ।
निंदक तेचि वंदूं लागती । भक्तिमार्गासी ॥ ३३ ॥
बद्धची होती मुमुक्ष । मूर्ख होती अतिदक्ष ।
अभक्तची पावती मोक्ष । भक्तिमार्गें ॥ ३४ ॥
नाना दोष ते नासती । पतित तेचि पावन होती ।
प्राणी पावे उत्तम गती । श्रवणमात्रें ॥ ३५ ॥
नाना धोकें देहबुद्धीचे । नाना किंत संदेहाचे ।
नाना उद्वेग संसाराचे । नासती श्रवणें ॥ ३६ ॥
ऐसी याची फळश्रुती । श्रवणें चुके अधोगती ।
मनास होय विश्रांती । समाधान ॥ ३७ ॥
जयाचा भावार्थ जैसा । तयास लाभ तैसा ।
मत्सर धरी जो पुंसा । तयास तेंचि प्राप्त ॥ ३८ ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ग्रंथारंभलक्षणनाम
॥ समास पहिला ॥ १ ॥
दासबोधात वीस दशके असून प्रत्येक दशकात अनेक समास आहेत. वर पहिल्या दशकातील पहिला समास दिलेला आहे.
सतराव्या शतकात मुसलमान राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राला त्रासले होते. सामान्यजन भयग्रस्त झालेले होते. अशा वेळी छत्रपती श्री शिवाजीमहाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. स्वराज्याचे सुराज्य होण्यासाठी व शूर राजाचे जाणत्या राजात रूपांतर होण्यासाठी ज्या संताचा लाभ महाराष्ट्राला झाला तो म्हणजे श्री समर्थ रामदास स्वामी. जांब गावी १५३० चैत्र शुद्ध नवमीस माध्यान्ही त्यांचा जन्म झाला.
त्यांचे नाव नारायण सयाजीपंत ठोसर. वयाच्या बाराव्या वर्षी, विवाहप्रसंगी 'सावधान' शब्द ऐकून ते लग्नमंडपातून पळून गेले. नंतर नाशिकजवळ, गोदावरीकाठी टाकळी येथे त्यांनी बारा वर्षे एकाग्रतेने रामोपासना केली. आत्मसाक्षात्कार होऊन ते स्वानुभवारूढ झाले. आत्मज्ञानाने संपन्न होऊन ते वयाच्या चोविसाव्या वर्षी तीर्थयात्रेसाठी बाहेर पडले. बारा वर्षे सबंध हिंदुस्तानभर त्यांनी पायी प्रवास केला.
वयाच्या छत्तीसाव्या वर्षी, शके १५६६ मध्ये ते कृष्णातीरी आले. त्यांनी अकरा मारुतींची स्थापना केली. शिवाजीमहाराजांना स्वराज्यहितोपदेश केला. महाराजांनी राज्य त्यांच्या झोळीत टाकल्यावर त्यांनी ते महाराजांनाच सांभाळण्यास सांगून स्वराज्यास भगवा ध्वज दिला. मनाचे श्लोक, दासबोध, विविध आरत्या इत्यादी विपुल साहित्य त्यांनी निर्माण केलेले आहे. त्यांच्या साहित्यावर अनेक पिढ्यांचे जीवन घडलेले आहे.
शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे ।
वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे ॥
कवी वाल्मिकासारिखा मान्य ऐसा ।
नमस्कार माझा सद्गुरू रामदासा ॥
उदासबोध (दासबोधाचे विडंबन)
-मंगेश पाडगावकर
आज हयात असते रामदास । तर भोवती बघुन हरामदास ।
अन्तरी जाले असते उदास । लागोन चिन्ता ॥ १ ॥
समर्थाचिया सेवका वक्र पाहे । ऐसा गल्लीगल्लीत गुन्ड आहे ।
त्यांचेवरी संरक्षण छत्र आहे । पोलीस पुढाऱ्यांचे ॥ २ ॥
या सत्याचा लागता शोध । कुठुन सुचता असता दासबोध ?
लिहिला असता उदासबोध । श्रीसमर्थांनी ॥ ३ ॥
भ्रष्टाचारे पोखरला देश । दीन जनांसी अपार क्लेश ।
दुर्जना यश । सज्जना अपेश सर्वत्र दिसे ॥ ४ ॥
नीतीचा डोळा काणा । प्रत्येक माणूस दीनवाणा ।
सर्व फ़ोलपटे नाही दाणा । पीक ऐसे ॥ ५ ॥
देवतांसी उचलून धरती । वेडेविद्रे नाच करती ।
भसाड ओसाड आरती । झोकून दारू ॥ ६ ॥
कबीर सांगे अल्लाची महती । मुंगीच्या पायी घुंगुर वाजती ।
तरी ते अल्लाशी ऐकु येती । ऐसे म्हणे ॥ ७ ॥
येथे अल्लासी बहिरा मानती । ठणाणा ध्वनीक्षेपक आणती ।
त्यातुन कर्कश बांग हाणती। अल्लासाठी ॥ ८ ॥
कंडम बरगड्यांच्या जनतेवरी । बिल्डर, स्मगलर, गुन्ड राज्य करी ।
प्रत्येक नेता खिसे भरी । हाती धरून तयांसी ॥ ९ ॥
दुष्काळ खणी, भुई फाटे । शोष पडून विहीर आटे ।
काळा कडु गहिवर दाटे । गळ्यात भविष्याच्या ॥ १० ॥
सत्या सामोरे पहाण्यासाठी । त्राण असावे लागे गाठी ।
भेकड पळपुट्याचे पाठी । हिजडा लागे ॥ ११ ॥
ग्रंथ नाम उदासबोध । कवी जनतेचा संवाद ।
काळा कडु आतला विषाद । हलका केला। ॥ १२ ॥
इति श्री उदासबोधे कविजनतासंवादे ग्रंथारंभनाम समास
उदासबोधातील पहिला समास वर दिलेला आहे. संपूर्ण ग्रंथात असे पन्नास समास आहेत.
मंगेश पाडगावकर यांचा जन्म १० मार्च १९२९ रोजी वेंगुर्ला, सिंधुदूर्ग इथे झाला. त्यांनी मराठी व संस्कृत मधून, मुंबई युनिव्हर्सिटीतून एम.ए. केले. ते युनायटेड स्टेटस् इन्फोर्मेशन सर्व्हिस मध्ये संपादक होते. जरी ते कवी म्हणून जास्त प्रसिद्ध असले तरी सिद्धहस्त लेखकही आहेत. त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांचे अनेक कवितासंग्रह आणि अनेक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यातील 'बोलगाणी' खूपच प्रसिद्ध आहे.
॥ समर्थ रामदासांचा दासबोध दशक १ ॥
॥ स्तवननाम दशक प्रथम ॥
॥ श्रीराम ॥
श्रोते पुसती कोण ग्रंथ। काय बोलिलें जी येथ ।
श्रवण केलियानें प्राप्त । काय आहे ॥ १ ॥
ग्रंथा नाम दासबोध। गुरुशिष्यांचा संवाद ।
येथ बोलिला विशद । भक्तिमार्ग ॥ २ ॥
नवविधा भक्ति आणि ज्ञान । बोलिलें वैराग्याचें लक्षण ।
बहुधा अध्यात्म निरोपण। निरोपिलें ॥ ३ ॥
भक्तिचेन योगें देव। निश्चयें पावती मानव ।
ऐसा आहे अभिप्राव। ईये ग्रंथीं ॥ ४ ॥
मुख्य भक्तीचा निश्चयो। शुद्धज्ञानाचा निश्चयो ।
आत्मस्थितीचा निश्चयो। बोलिला असे ॥ ५ ॥
शुद्ध उपदेशाचा निश्चयो। सायोज्यमुक्तीचा निश्चयो ।
मोक्षप्राप्तीचा निश्चयो । बोलिला असे ॥ ६ ॥
शुद्धस्वरूपाचा निश्चयो । विदेहस्थितीचा निश्चयो ।
अलिप्तपणाचा निश्चयो। बोलिला असे ॥ ७ ॥
मुख्य देवाचा निश्चयो। मुख्य भक्ताचा निश्चयो ।
जीवशिवाचा निश्चयो। बोलिला असे ॥ ८ ॥
मुख्य ब्रह्माचा निश्चयो । नाना मतांचा निश्चयो ।
आपण कोण हा निश्चयो । बोलिला असे ॥ ९ ॥
मुख्य उपासनालक्षण । नाना कवित्वलक्षण ।
नाना चातुर्यलक्षण । बोलिलें असे ॥ १० ।
मायोद्भवाचें लक्षण । पंचभूतांचे लक्षण ।
कर्ता कोण हें लक्षण । बोलिलें असे ॥ ११ ॥
नाना किंत निवारिले । नाना संशयो छेदिले ।
नाना आशंका फेडिले । नाना प्रश्न ॥ १२ ॥
ऐसें बहुधा निरोपिलें । ग्रंथगर्भी जें बोलिलें ।
तें अवघेंचि अनुवादलें । न वचे किं कदा ॥ १३ ॥
तथापि अवघा दासबोध । दशक फोडून केला विशद ।
जे जे दशकींचा अनुवाद । ते ते दशकीं बोलिला ॥ १४ ॥
नाना ग्रंथांच्या समती । उपनिषदें वेदांत श्रुती ।
आणि मुख्य आत्मप्रचीती । शास्त्रेंसहित ॥ १५ ॥
नाना समतीअन्वये । म्हणौनी मिथ्या म्हणतां न ये ।
तथापि हें अनुभवासि ये । प्रत्यक्ष आतां ॥ १६ ॥
मत्सरें यासी मिथ्या म्हणती । तरी अवघेचि ग्रंथ उछेदती ।
नाना ग्रंथांच्या समती । भगवद्वाक्यें ॥ १७ ॥
शिवगीता रामगीता । गुरुगीता गर्भगीता ।
उत्तरगीता अवधूतगीता । वेद आणी वेदांत ॥ १८ ॥
भगवद्गीता ब्रह्मगीता । हंसगीता पाण्डवगीता ।
गणेशगीता येमगीता । उपनिषदें भागवत ॥ १९ ॥
इत्यादिक नाना ग्रंथ । समतीस बोलिले येथ ।
भगवद्वाक्ये येथार्थ । निश्चयेंसीं ॥ २० ॥
भगवद्वचनीं अविश्वासे । ऐसा कोण पतित असे
भगवद्वाक्याविरहित नसे । बोलणे येथीचें ॥ २१ ॥
पूर्णग्रंथ पाहिल्याविण । उगाच ठेवी जो दूषण ।
तो दुरात्मा दुराभिमान । मत्सरें करी ॥ २२ ॥
अभिमानें उठे मत्सर । मत्सरें ये तिरस्कार ।
पुढें क्रोधाचा विकार । प्रबळे बळें ॥ २३ ॥
ऐसा अंतरी नासला । कामक्रोधें खवळला ।
अहंभावे पालटला । प्रत्यक्ष दिसे ॥ २४ ॥
कामक्रोधें लिथाडिला । तो कैसा म्हणावा भला ।
अमृत सेवितांच पावला । मृत्य राहो ॥ २५ ॥
आतां असो हें बोलणें । अधिकारासारिखें घेणें ।
परंतु अभिमान त्यागणें । हें उत्तमोत्तम ॥ २६ ॥
मागां श्रोतीं आक्षेपिलें । जी ये ग्रंथीं काय बोलिलें ।
तें सकळहि निरोपिलें । संकळीत मार्गे ॥ २७ ॥
आतां श्रवण केलियाचें फळ । क्रिया पालटे तत्काळ ।
तुटे संशयाचें मूळ। येकसरां ॥ २८ ॥
मार्ग सांपडे सुगम। न लगे साधन दुर्गम ।
सायोज्यमुक्तीचें वर्म । ठांइं पडे ॥ २९ ॥
नासे अज्ञान दुःख भ्रांती । शीघ्रचि येथें ज्ञानप्राप्ती ।
ऐसी आहे फळश्रुती । ईये ग्रंथीं ॥ ३० ॥
योगियांचे परम भाग्य । आंगीं बाणे तें वैराग्य ।
चातुर्य कळे यथायोग्य । विवेकेंसहित ॥ ३१ ॥
भ्रांत अवगुणी अवलक्षण । तेंचि होती सुलक्षण ।
धूर्त तार्किक विचक्षण । समयो जाणती ॥ ३२ ॥
आळसी तेचि साक्षपी होती । पापी तेचि प्रस्तावती ।
निंदक तेचि वंदूं लागती । भक्तिमार्गासी ॥ ३३ ॥
बद्धची होती मुमुक्ष । मूर्ख होती अतिदक्ष ।
अभक्तची पावती मोक्ष । भक्तिमार्गें ॥ ३४ ॥
नाना दोष ते नासती । पतित तेचि पावन होती ।
प्राणी पावे उत्तम गती । श्रवणमात्रें ॥ ३५ ॥
नाना धोकें देहबुद्धीचे । नाना किंत संदेहाचे ।
नाना उद्वेग संसाराचे । नासती श्रवणें ॥ ३६ ॥
ऐसी याची फळश्रुती । श्रवणें चुके अधोगती ।
मनास होय विश्रांती । समाधान ॥ ३७ ॥
जयाचा भावार्थ जैसा । तयास लाभ तैसा ।
मत्सर धरी जो पुंसा । तयास तेंचि प्राप्त ॥ ३८ ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ग्रंथारंभलक्षणनाम
॥ समास पहिला ॥ १ ॥
दासबोधात वीस दशके असून प्रत्येक दशकात अनेक समास आहेत. वर पहिल्या दशकातील पहिला समास दिलेला आहे.
सतराव्या शतकात मुसलमान राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राला त्रासले होते. सामान्यजन भयग्रस्त झालेले होते. अशा वेळी छत्रपती श्री शिवाजीमहाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. स्वराज्याचे सुराज्य होण्यासाठी व शूर राजाचे जाणत्या राजात रूपांतर होण्यासाठी ज्या संताचा लाभ महाराष्ट्राला झाला तो म्हणजे श्री समर्थ रामदास स्वामी. जांब गावी १५३० चैत्र शुद्ध नवमीस माध्यान्ही त्यांचा जन्म झाला.
त्यांचे नाव नारायण सयाजीपंत ठोसर. वयाच्या बाराव्या वर्षी, विवाहप्रसंगी 'सावधान' शब्द ऐकून ते लग्नमंडपातून पळून गेले. नंतर नाशिकजवळ, गोदावरीकाठी टाकळी येथे त्यांनी बारा वर्षे एकाग्रतेने रामोपासना केली. आत्मसाक्षात्कार होऊन ते स्वानुभवारूढ झाले. आत्मज्ञानाने संपन्न होऊन ते वयाच्या चोविसाव्या वर्षी तीर्थयात्रेसाठी बाहेर पडले. बारा वर्षे सबंध हिंदुस्तानभर त्यांनी पायी प्रवास केला.
वयाच्या छत्तीसाव्या वर्षी, शके १५६६ मध्ये ते कृष्णातीरी आले. त्यांनी अकरा मारुतींची स्थापना केली. शिवाजीमहाराजांना स्वराज्यहितोपदेश केला. महाराजांनी राज्य त्यांच्या झोळीत टाकल्यावर त्यांनी ते महाराजांनाच सांभाळण्यास सांगून स्वराज्यास भगवा ध्वज दिला. मनाचे श्लोक, दासबोध, विविध आरत्या इत्यादी विपुल साहित्य त्यांनी निर्माण केलेले आहे. त्यांच्या साहित्यावर अनेक पिढ्यांचे जीवन घडलेले आहे.
शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे ।
वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे ॥
कवी वाल्मिकासारिखा मान्य ऐसा ।
नमस्कार माझा सद्गुरू रामदासा ॥
उदासबोध (दासबोधाचे विडंबन)
-मंगेश पाडगावकर
आज हयात असते रामदास । तर भोवती बघुन हरामदास ।
अन्तरी जाले असते उदास । लागोन चिन्ता ॥ १ ॥
समर्थाचिया सेवका वक्र पाहे । ऐसा गल्लीगल्लीत गुन्ड आहे ।
त्यांचेवरी संरक्षण छत्र आहे । पोलीस पुढाऱ्यांचे ॥ २ ॥
या सत्याचा लागता शोध । कुठुन सुचता असता दासबोध ?
लिहिला असता उदासबोध । श्रीसमर्थांनी ॥ ३ ॥
भ्रष्टाचारे पोखरला देश । दीन जनांसी अपार क्लेश ।
दुर्जना यश । सज्जना अपेश सर्वत्र दिसे ॥ ४ ॥
नीतीचा डोळा काणा । प्रत्येक माणूस दीनवाणा ।
सर्व फ़ोलपटे नाही दाणा । पीक ऐसे ॥ ५ ॥
देवतांसी उचलून धरती । वेडेविद्रे नाच करती ।
भसाड ओसाड आरती । झोकून दारू ॥ ६ ॥
कबीर सांगे अल्लाची महती । मुंगीच्या पायी घुंगुर वाजती ।
तरी ते अल्लाशी ऐकु येती । ऐसे म्हणे ॥ ७ ॥
येथे अल्लासी बहिरा मानती । ठणाणा ध्वनीक्षेपक आणती ।
त्यातुन कर्कश बांग हाणती। अल्लासाठी ॥ ८ ॥
कंडम बरगड्यांच्या जनतेवरी । बिल्डर, स्मगलर, गुन्ड राज्य करी ।
प्रत्येक नेता खिसे भरी । हाती धरून तयांसी ॥ ९ ॥
दुष्काळ खणी, भुई फाटे । शोष पडून विहीर आटे ।
काळा कडु गहिवर दाटे । गळ्यात भविष्याच्या ॥ १० ॥
सत्या सामोरे पहाण्यासाठी । त्राण असावे लागे गाठी ।
भेकड पळपुट्याचे पाठी । हिजडा लागे ॥ ११ ॥
ग्रंथ नाम उदासबोध । कवी जनतेचा संवाद ।
काळा कडु आतला विषाद । हलका केला। ॥ १२ ॥
इति श्री उदासबोधे कविजनतासंवादे ग्रंथारंभनाम समास
उदासबोधातील पहिला समास वर दिलेला आहे. संपूर्ण ग्रंथात असे पन्नास समास आहेत.
मंगेश पाडगावकर यांचा जन्म १० मार्च १९२९ रोजी वेंगुर्ला, सिंधुदूर्ग इथे झाला. त्यांनी मराठी व संस्कृत मधून, मुंबई युनिव्हर्सिटीतून एम.ए. केले. ते युनायटेड स्टेटस् इन्फोर्मेशन सर्व्हिस मध्ये संपादक होते. जरी ते कवी म्हणून जास्त प्रसिद्ध असले तरी सिद्धहस्त लेखकही आहेत. त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांचे अनेक कवितासंग्रह आणि अनेक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यातील 'बोलगाणी' खूपच प्रसिद्ध आहे.
लेबल:
कविता,
विडंबने,
विडंबने-२ दासबोध आणि उदासबोध
विडंबने-१ आम्ही कोण?
आम्ही कोण?
आम्ही कोण म्हणूनि काय पुससी? आम्ही असू लाडके ।
देवाचे, दिधले असे जग तये आम्हांस खेळावया ॥
विश्वी या प्रतिभाबले विचरतो चोहीकडे लीलया ।
दिक्कालातूनि आरपार अमुची दृष्टी पहाया शके ॥ १ ॥
सारेही बडिवार येथिल पाहा! आम्हापुढे ते फिके ।
पाणिस्पर्शच आमुचा शकतसे वस्तूप्रती द्यावया ॥
सौन्दर्यातिशया, अशी वसतसे जादू करांमाजी या ।
फोले पाखडिता तुम्ही, निवडतो ते सत्त्व आम्ही निके ! ॥ २ ॥
शून्यामाजि वसाहती वसविल्या कोणी सुरांच्या बरे ? ।
पृथ्वीला सुरलोकसाम्य झटती आणावया कोण ते ? ॥
ते आम्हीच, सुधा कृतींमधुनिया ज्यांच्या सदा पाझरे ।
ते आम्हीच, शरण्य मंगल तुम्हां ज्यांपासुनी लाभते ! ॥ ३ ॥
आम्हाला वगळा - गतप्रभ झणी होतील तारांगणे ।
आम्हाला वगळा - विकेल कवडीमोलावरी हे जिणे ! ॥
मूळ कवीः कृष्णाजी केशव दामले उर्फ केशवसु, फैजपूर, २९ नोव्हेंबर, १९०१, मनोरंजन, मे, १९०२
ही कविता त्यांच्या 'हरपले श्रेय' ह्या कॉन्टिनेंटल प्रकाशनच्या १९८५ सालच्या पुनर्मुद्रणातून घेतलेली आहे. कृष्णाजी केशव दामले उर्फ केशवसुत (०७-१०-१८६६ ते ०७-११-१९०५) हे मराठी नवकवितेचे आद्य उद्गाते होत. केशवसुत मुख्याध्यापक होते. ते वयाच्या 39 व्या वर्षी प्लेगने वारले.
केशवसुतांच्या निवडक कविता 'हरपले श्रेय' ह्या त्यांच्या कवितासंग्रहात प्रसिद्ध झालेल्या आहेत. 'अढळ सौंदर्य' ह्या कवितेत, त्यांनी निसर्गाचे सौंदर्य कसे अढळ असते, त्याचे बहारदार वर्णन केलेले आहे. त्यांची 'गोष्टी घराकडील' ही कविता, गावातील स्वगृहाचे स्वाभिमानाने गुणगान करण्याचा एक उत्कृष्ट नमुना आहे. त्यांनी 'दुर्मुखलेला' ह्या कवितेत, त्यांना दुर्मुखलेला म्हणणाऱ्या शिक्षकाला उद्देशून, 'लंगड्यास लंगडा म्हटल्याने काहीच साध्य होत नाही, लंगडा मात्र मनाने दुखावल्या जातो' हे जगन्मान्य सत्य निर्विवादपणे उजागर केलेले आहे.
लोकमानसात त्यांच्या तुतारी कवितेचे स्थान अढळ आहे. 'आम्ही कोण?' ह्या कवितेत त्यानी व्यक्तविलेला कवीविषयक दृष्टिकोन आजवर मी वाचलेल्या सर्व अभिप्रायात सर्वोत्कृष्ट म्हणता येईल. त्यातून केवढा आत्मविश्वास प्रकट होतो ते प्रत्यक्षच वाचून सहज समजेल.
आम्ही कोण? (विडंबन)
केशवसुत, क्षमा करा.
आम्ही कोण? म्हणून काय पुसतां दांताड वेंगाडुनी? ।
फोटो मासिक पुस्तकांत न तुम्ही का आमुचा पाहिला? ॥
किंवा गुच्छ तरंग अंजली कसा अद्यापि ना वाचिला? ।
चाले ज्यावरती अखंड स्तुतिचा वर्षाव पत्रांतुनी? ॥ १ ॥
ते आम्ही - परवाङ्मयातिल करूं चोरून भाषांतरे, ।
ते आम्ही - न कुणास देऊ अगदी याचा सुगावा परी! ॥
डोळ्यांदेखत घालुनी दरवडा आम्ही कुबेराघरी! ।
त्याचे वाग्धन वापरून लपवूं ही आमुची लक्तरे! ॥ २ ॥
काव्याची भरगच्च घेऊनि सदा काखोटिला पोतडी, ।
दावूं गाउनि आमुच्याच कविता आम्हीच रस्त्यामधे, ॥
दोस्तांचे घट बैसवून करुं या आम्ही तयांचा उदे ।
दुष्मानांवर एकजात तुटुनी की लोंबवू चामडीं! ॥ ३ ॥
आम्हाला वगळा - गतप्रभ झणीं होतील साप्ताहिके! ।
आम्हाला वगळा - खलास सगळी होतील ना मासिके! ॥
विडंबन: आचार्य प्रल्हाद केशव अत्रे उर्फ केशवकुमार, १९२२
ही कविता आचार्य अत्रे यांच्या झेंडूची फुले ह्या, परचुरे प्रकाशनतर्फे १९८६ साली प्रसिद्ध झालेल्या, अकराव्या आवृत्तीतून घेतलेली आहे. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे उर्फ केशवकुमार (१३-०८-१८९८ सासवड, ते १३-०६-१९६९) हे, मराठी शिक्षणक्षेत्र (कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या प्रशालेत प्रिन्सिपॉल, अनेक शिक्षक परिषदांचे अध्यक्ष, बी.टी. चे परीक्षक), वाङमय (कऱ्हेचे पाणी हे आत्मवृत्त, बडोदा वाङमय परिषदेचे अध्यक्ष), साहित्य (झेंडूची फुले, बडोद्याच्या कुमारसाहित्य परिषदेचे अध्यक्ष, नाशिक साहित्यसंमेलनाचे अध्यक्ष), नाटक (साष्टांग नमस्कार, ब्रह्मचारी, घराबाहेर, उद्याचा संसार), चित्रपट (पायची दासी, पहिले राष्ट्रपती सुवर्णपदक विजेता शामची आई, चित्रमंदिर चित्रपटगृहाचे मालक, अत्रे पिक्चर्स चे निर्माता), पत्रकारिता (जयहिंद सायंदैनिक, दैनिक मराठा, नवयुग साप्ताहिक, समीक्षक मासिक यांचे संपादन, बेळगावच्या पत्रकार संमेलनाचे अध्यक्ष, अत्रे प्रिंटींग प्रेस), राजकारण (कॉन्ग्रेस, समाजवादी पक्ष, संयुक्त महाराष्ट्र परिषद यांचे कार्यकर्ते, आमदार, लोकसभा निवडणुकीत अपयश), समाजकारण (संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेते) या सर्वांवर अमिट छाप सोडणारे उत्तुंग व्यक्तिमत्त्व आहे. व्यवसायाने शिक्षणतज्ञ (बी.ए., बी.टी., टी.डी. लंडन) असणाऱ्या अत्र्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अत्यंत कळीची भूमिका बजावली. त्यांच्या कऱ्हेचे पाणी ह्या पाच खंडी आत्मवृत्ताच्या प्रस्तावनेत ते म्हणतात:
"आयुष्यात मी काय वाटेल ते केले असेल, पण ढोंग कधी केले नाही. ढोंगाचा मी पहिल्यापासून शत्रू. माझ्या नाटकांतून, चित्रपटांतून आणि वृत्तपत्रांतून ढोंगाचे मी क्रूरपणे वाभाडे काढलेले आहेत. गेली पन्नास वर्षे समाजाच्या सर्व अंतरंगांमधून मी वावरलो आहे. मजुरापासून तो महाराजापर्यंत, शाळामास्तरापासून तो गिरणीमालकापर्यंत आणि कंगालापासून तो कुबेरापर्यंत मी अनिरुद्ध संचार केलेला आहे. त्यामुळे समाजाच्या बहिरंगामध्ये आणि त्याच्या अंतरंगामध्ये केवढी फारकत आहे, ह्याची जाणीव माझ्या इतकी दुसऱ्या कुणालाही असणे शक्य नाही. आज जीवनाच्या सर्व क्षेत्रात दंभाचा आणि ढोंगाचा जो बुजबुजाट झालेला आहे त्याचे कारण सत्य काय आहे हे जाणण्याचे आणि सांगण्याचे फार थोड्या लोकांत धैर्य आहे. ते धैर्य दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे."
त्यांचा झेंडूची फुले नावाचा विडंबनात्मक कवितासंग्रह जगद्विख्यात आहे. मराठीत तरी दुसरा विडंबनकाव्यसंग्रह वाचल्याचे मला स्मरत नाही. त्यांच्या सर्वव्यापी अनुभवाचे सार रोकड्या शब्दात, त्यामध्ये व्यक्त झालेले आहे. हे पुस्तक मुळातच वाचनीय आहे. त्यातच 'आम्ही कोण' ह्या केशवसुतांच्या कवितेचे हे विडंबन दिलेले आहे. विडंबनाची व्याख्या, वापर आणि मर्यादा ह्यांबाबत त्या पुस्तकाचे संपादक श्री.स.गं.मालशे, स्वत: आचार्य अत्रे आणि त्यांचे गुरू साहित्याचार्य श्रीपाद कृष्ण उर्फ तात्यासाहेब कोल्हटकर यांचे विचार ह्या पुस्तकात ग्रथित केलेले आहेत.
आम्ही कोण?
आम्ही कोण म्हणूनि काय पुससी? आम्ही असू लाडके ।
देवाचे, दिधले असे जग तये आम्हांस खेळावया ॥
विश्वी या प्रतिभाबले विचरतो चोहीकडे लीलया ।
दिक्कालातूनि आरपार अमुची दृष्टी पहाया शके ॥ १ ॥
सारेही बडिवार येथिल पाहा! आम्हापुढे ते फिके ।
पाणिस्पर्शच आमुचा शकतसे वस्तूप्रती द्यावया ॥
सौन्दर्यातिशया, अशी वसतसे जादू करांमाजी या ।
फोले पाखडिता तुम्ही, निवडतो ते सत्त्व आम्ही निके ! ॥ २ ॥
शून्यामाजि वसाहती वसविल्या कोणी सुरांच्या बरे ? ।
पृथ्वीला सुरलोकसाम्य झटती आणावया कोण ते ? ॥
ते आम्हीच, सुधा कृतींमधुनिया ज्यांच्या सदा पाझरे ।
ते आम्हीच, शरण्य मंगल तुम्हां ज्यांपासुनी लाभते ! ॥ ३ ॥
आम्हाला वगळा - गतप्रभ झणी होतील तारांगणे ।
आम्हाला वगळा - विकेल कवडीमोलावरी हे जिणे ! ॥
मूळ कवीः कृष्णाजी केशव दामले उर्फ केशवसु, फैजपूर, २९ नोव्हेंबर, १९०१, मनोरंजन, मे, १९०२
ही कविता त्यांच्या 'हरपले श्रेय' ह्या कॉन्टिनेंटल प्रकाशनच्या १९८५ सालच्या पुनर्मुद्रणातून घेतलेली आहे. कृष्णाजी केशव दामले उर्फ केशवसुत (०७-१०-१८६६ ते ०७-११-१९०५) हे मराठी नवकवितेचे आद्य उद्गाते होत. केशवसुत मुख्याध्यापक होते. ते वयाच्या 39 व्या वर्षी प्लेगने वारले.
केशवसुतांच्या निवडक कविता 'हरपले श्रेय' ह्या त्यांच्या कवितासंग्रहात प्रसिद्ध झालेल्या आहेत. 'अढळ सौंदर्य' ह्या कवितेत, त्यांनी निसर्गाचे सौंदर्य कसे अढळ असते, त्याचे बहारदार वर्णन केलेले आहे. त्यांची 'गोष्टी घराकडील' ही कविता, गावातील स्वगृहाचे स्वाभिमानाने गुणगान करण्याचा एक उत्कृष्ट नमुना आहे. त्यांनी 'दुर्मुखलेला' ह्या कवितेत, त्यांना दुर्मुखलेला म्हणणाऱ्या शिक्षकाला उद्देशून, 'लंगड्यास लंगडा म्हटल्याने काहीच साध्य होत नाही, लंगडा मात्र मनाने दुखावल्या जातो' हे जगन्मान्य सत्य निर्विवादपणे उजागर केलेले आहे.
लोकमानसात त्यांच्या तुतारी कवितेचे स्थान अढळ आहे. 'आम्ही कोण?' ह्या कवितेत त्यानी व्यक्तविलेला कवीविषयक दृष्टिकोन आजवर मी वाचलेल्या सर्व अभिप्रायात सर्वोत्कृष्ट म्हणता येईल. त्यातून केवढा आत्मविश्वास प्रकट होतो ते प्रत्यक्षच वाचून सहज समजेल.
आम्ही कोण? (विडंबन)
केशवसुत, क्षमा करा.
आम्ही कोण? म्हणून काय पुसतां दांताड वेंगाडुनी? ।
फोटो मासिक पुस्तकांत न तुम्ही का आमुचा पाहिला? ॥
किंवा गुच्छ तरंग अंजली कसा अद्यापि ना वाचिला? ।
चाले ज्यावरती अखंड स्तुतिचा वर्षाव पत्रांतुनी? ॥ १ ॥
ते आम्ही - परवाङ्मयातिल करूं चोरून भाषांतरे, ।
ते आम्ही - न कुणास देऊ अगदी याचा सुगावा परी! ॥
डोळ्यांदेखत घालुनी दरवडा आम्ही कुबेराघरी! ।
त्याचे वाग्धन वापरून लपवूं ही आमुची लक्तरे! ॥ २ ॥
काव्याची भरगच्च घेऊनि सदा काखोटिला पोतडी, ।
दावूं गाउनि आमुच्याच कविता आम्हीच रस्त्यामधे, ॥
दोस्तांचे घट बैसवून करुं या आम्ही तयांचा उदे ।
दुष्मानांवर एकजात तुटुनी की लोंबवू चामडीं! ॥ ३ ॥
आम्हाला वगळा - गतप्रभ झणीं होतील साप्ताहिके! ।
आम्हाला वगळा - खलास सगळी होतील ना मासिके! ॥
विडंबन: आचार्य प्रल्हाद केशव अत्रे उर्फ केशवकुमार, १९२२
ही कविता आचार्य अत्रे यांच्या झेंडूची फुले ह्या, परचुरे प्रकाशनतर्फे १९८६ साली प्रसिद्ध झालेल्या, अकराव्या आवृत्तीतून घेतलेली आहे. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे उर्फ केशवकुमार (१३-०८-१८९८ सासवड, ते १३-०६-१९६९) हे, मराठी शिक्षणक्षेत्र (कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या प्रशालेत प्रिन्सिपॉल, अनेक शिक्षक परिषदांचे अध्यक्ष, बी.टी. चे परीक्षक), वाङमय (कऱ्हेचे पाणी हे आत्मवृत्त, बडोदा वाङमय परिषदेचे अध्यक्ष), साहित्य (झेंडूची फुले, बडोद्याच्या कुमारसाहित्य परिषदेचे अध्यक्ष, नाशिक साहित्यसंमेलनाचे अध्यक्ष), नाटक (साष्टांग नमस्कार, ब्रह्मचारी, घराबाहेर, उद्याचा संसार), चित्रपट (पायची दासी, पहिले राष्ट्रपती सुवर्णपदक विजेता शामची आई, चित्रमंदिर चित्रपटगृहाचे मालक, अत्रे पिक्चर्स चे निर्माता), पत्रकारिता (जयहिंद सायंदैनिक, दैनिक मराठा, नवयुग साप्ताहिक, समीक्षक मासिक यांचे संपादन, बेळगावच्या पत्रकार संमेलनाचे अध्यक्ष, अत्रे प्रिंटींग प्रेस), राजकारण (कॉन्ग्रेस, समाजवादी पक्ष, संयुक्त महाराष्ट्र परिषद यांचे कार्यकर्ते, आमदार, लोकसभा निवडणुकीत अपयश), समाजकारण (संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेते) या सर्वांवर अमिट छाप सोडणारे उत्तुंग व्यक्तिमत्त्व आहे. व्यवसायाने शिक्षणतज्ञ (बी.ए., बी.टी., टी.डी. लंडन) असणाऱ्या अत्र्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अत्यंत कळीची भूमिका बजावली. त्यांच्या कऱ्हेचे पाणी ह्या पाच खंडी आत्मवृत्ताच्या प्रस्तावनेत ते म्हणतात:
"आयुष्यात मी काय वाटेल ते केले असेल, पण ढोंग कधी केले नाही. ढोंगाचा मी पहिल्यापासून शत्रू. माझ्या नाटकांतून, चित्रपटांतून आणि वृत्तपत्रांतून ढोंगाचे मी क्रूरपणे वाभाडे काढलेले आहेत. गेली पन्नास वर्षे समाजाच्या सर्व अंतरंगांमधून मी वावरलो आहे. मजुरापासून तो महाराजापर्यंत, शाळामास्तरापासून तो गिरणीमालकापर्यंत आणि कंगालापासून तो कुबेरापर्यंत मी अनिरुद्ध संचार केलेला आहे. त्यामुळे समाजाच्या बहिरंगामध्ये आणि त्याच्या अंतरंगामध्ये केवढी फारकत आहे, ह्याची जाणीव माझ्या इतकी दुसऱ्या कुणालाही असणे शक्य नाही. आज जीवनाच्या सर्व क्षेत्रात दंभाचा आणि ढोंगाचा जो बुजबुजाट झालेला आहे त्याचे कारण सत्य काय आहे हे जाणण्याचे आणि सांगण्याचे फार थोड्या लोकांत धैर्य आहे. ते धैर्य दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे."
त्यांचा झेंडूची फुले नावाचा विडंबनात्मक कवितासंग्रह जगद्विख्यात आहे. मराठीत तरी दुसरा विडंबनकाव्यसंग्रह वाचल्याचे मला स्मरत नाही. त्यांच्या सर्वव्यापी अनुभवाचे सार रोकड्या शब्दात, त्यामध्ये व्यक्त झालेले आहे. हे पुस्तक मुळातच वाचनीय आहे. त्यातच 'आम्ही कोण' ह्या केशवसुतांच्या कवितेचे हे विडंबन दिलेले आहे. विडंबनाची व्याख्या, वापर आणि मर्यादा ह्यांबाबत त्या पुस्तकाचे संपादक श्री.स.गं.मालशे, स्वत: आचार्य अत्रे आणि त्यांचे गुरू साहित्याचार्य श्रीपाद कृष्ण उर्फ तात्यासाहेब कोल्हटकर यांचे विचार ह्या पुस्तकात ग्रथित केलेले आहेत.
लेबल:
कविता,
विडंबने,
विडंबने-१ आम्ही कोण?
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)